वेताळ ने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे तो पुन्हा राजा विक्रमादित्याच्या तावडीतून सुटून झाडावर जाऊन बसत असे. पण, धैर्य आणि पराक्रम अंगी असल्यामुळे कंटाळा, आळस झटकून राजा पुन्हा वापस गेला आणि वेताळला घेऊन नगराच्या दिशेने चालू लागला. बरयाच वेळ शांतपणे चालत असताना वेताळने राजाला पुन्हा एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला बेडकांचा आवाज आला. त्यावर वेताळ म्हणाला, ‘‘राजा आज मी तुला एक प्रश्न विचारतो, जो या बेडकांशी संबंधित आहे.'' दोन मित्र होते. जे सतत विज्ञानाचे नवीन प्रयोग करीत असे. बेडकासोबत प्रयोग करीत असताना एका मित्राने बेडकाला उकळत्या पाण्यात टाकले. त्याच सुमारास दुसरा मित्र वेगळा प्रयोग करीत होता. त्याने प्रथम बेडकाला साध्या पाण्यात टाकले. मग त्या पाण्याला त्याने गरम करायला सुरुवात केली. हळूहळू ते पाणी गरम होऊ लागले आणि थोड्याच वेळाने त्या भांड्यातले पाणी उकळू लागले. इतकी गोष्ट सांगून वेताळने राजाला विचारले, ‘‘राजा दोन्ही बेडकं हे उकळत्या पाण्यात आहे. त्यात असलेल्या बेडकांचं काय झालं असेल. मला या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा तुझ्या डोक्याचे तुकडे-तुकडे होतील.''
या वेळेस मात्र राजा विचारात पडला. दोन्ही बेडूक एकाच परिस्थितीत आहे. फक्त त्या परिस्थितीपर्यंत ते वेगवेगळ्या मार्गाने पोहोचले आहेत. दोन्ही बेडकं मेली असावीत, असा त्याचा विचार झाला. पण, अचानक त्याला inflation (महागाई वाढी चा दर) आणि त्यामुळे त्याच्या होणाऱ्या परिणामांची आठवण झाली आणि तो बोलू लागला.
वेताळ, ह्या प्रयोग मुळे मला महागाई वाढीचा दराने त्रासलेल्या, पण त्याकरिता गुंतवणुकीत कुठलेच बदल न करणारया गुंतवणूकदाराची आठवण आली. खरं तर दोन्ही प्रयोगांमध्ये बेडूक उकळत्या पाण्यात आहे त्यामुळे साहजिकच असं वाटेल की, दोन्ही बेडूक मेले असावेत, पण ते बरोबर नाही. पहिल्या प्रयोगात जेव्हा बेडकाला सामान्य तापमानातून उकळत्या पाण्यात टाकलं त्या वेळेस एकदम झालेला बदल बेडकाच्या लक्षात येईल आणि तो उडी मारून भांड्याच्या बाहेर येईल किवा तसा प्रयत्न सतत करेल आणि कदाचित यशस्वी होऊन जिवंत राहील. दुसऱ्या प्रयोगात मात्र बेडूक शांत आहे. कारण, तो सामान्य तापमानाच्या पाण्यात आहे. त्या वातावरणाची / तापमानाची त्याला सवय झाली असेल. तापमानात अतिशय हळू बदल केल्यामुळे त्यातले बदल त्याच्या लक्षात येणार नाही. ज्या पाण्यात तो आधीपासून आहे त्यात अचनाक मोठा बदल झाला नसल्यामुळे गरम होत असलेलं पाणी हेच सामान्य तापमानाचं पाणी आहे या भ्रमात/विचाराने तो भांड्याच्या बाहेर यायचा प्रयत्न करणार नाही. पण, जेव्हा पाणी उकळायला लागेल आणि तापमान असह्य होईल त्या वेळेस मात्र बेडूक निश्चितच मरेल.
Inflation हे एक असंच हळूहळू गरम होणारं पाणी आहे, ज्यात सामान्य जनता/गुंतवणूकदार होरपळले जातात. Inflation हे एक slow poison आहे ज्याचा प्रभाव लगेच जाणवत नाही. आर्थिक क्षेत्रात मोठी घडामोड झाल्यास गुंतवणूकदार त्याचा काय प्रभाव राहील याची ऊहापोह करून बदल करीत असतो. पेट्रोल एकदम महाग झाल्यास कारऐवजी टू-व्हीलर किवा पेट्रोल कारऐवजी डिझेल कारचा वापर, असे काही उपाय करीत असतो. पण या गोष्टी/मोठे बदल वारंवार होत नसतात. पण, दैनंदिन वापराच्या गोष्टींची भाववाढ ही सतत होत असते आणि त्याचा बदल खूप मोठा नसतो, पण जसा जसा काळ वाढत जातो त्याचा प्रभाव जाणवू लागतो.
Particular | Prices 2001-02 | Prices 2010-11 | % Change |
Sugar (1 Kg) | 16 | 40 | 9.60% |
Cooking Oil (5 Ltrs) | 290 | 450 | 5% |
Rice (Per Kg) | 14 | 40 | 11.07% |
Pulses (Per Kg) | 20-30 | 50-80 | 10.31% |
Wheat (Per Kg) | 10 | 25 | 11.70% |
Detergent | 23 | 70 | 11.70% |
Soap (Personal Care) | 7 | 18 | 9.90% |
Petrol (1 Ltr) | 34 | 75 | 8.23% |
नोट: वर सांगितलेल्या प्रयोगाला Boiling Frog Syndrome असेही म्हणतात. काही वैज्ञानिकांच्या मते दुसऱ्या प्रयोगातील बेडूक सुद्धा बाहेर उडी मारेल आणि वाचेल. पण, छोटे बदल अपेक्षित असूनही त्याकडे दुर्लक्ष करून बदल न केल्या ने मोठं नुकसान होऊ शकतं याकरिता सहसा हे उदाहरण देण्यात येतं.